HOME   फोटो फिचर

आश्चर्यम! वृक्षारोपणातली झाडं अजुनही टिकून....

आश्चर्यम! वृक्षारोपणातली झाडं अजुनही टिकून....

लातुरच्या महानगरपालिकेनं मोठा गाजावाजा करीत वृक्षारोपण केलं. अनेक ठिकाणी खड्ड्यात नुसतीच झाडे फेकण्यात आली होती. जी उभी केली त्याला पाणी घातले नाही. ज्याला पाणी घातले त्याची निगा ठेवली नाही. ही झाडे मग हवेत विरघळून गेली, आकाशात उडून गेली, काही अदृश्य झाली. उरले फक्त वेडेवाकडे खड्डे! मागच्या वर्षी लातूर सुशोभिकरणाच्या मोहिमेत अनेक ठिकाणी विचारपूर्वक झाडे लावण्यात आली. त्यांची निगा ठेवली. आज असल्या उन्हाळ्यातही ही झाडे हिरवीगार आहेत. उंचही झाली आहेत. राजस्थान शाळेसमोरच्या रस्त्यावर ही झाडे पाहता येतील.

Comments

Top