HOME   व्हिडिओ न्यूज

व्हीएस पॅंथर्सकडून गोर गरिबांना आधार

सामुहिक विवाहाच्या माध्यमातून खटके-मस्के यांचे मार्गदर्शक काम- आ. अमित देशमुख


लातूर: दुष्काळ, नापिकी आणि आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुला मुलींचे विवाह जुळवणे अवघड बनले आहे. परिणामी, सर्व सामान्य कुटुंबांना लग्नाचा प्रश्न सातत्त्याने भेडसावत आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे सामान्य कुटुंबियांची अडचण दूर झाली असल्याने प्रतिपादन माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यंनी येथे केले. लातूर येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर रविवारी व्हीएस पॅंथर्स संघटनेच्या वतीने तिसरा सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आ. अमित देशमुख बोलत होते. मंचावर उस्मानाबाद जिल्हा प्ररिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील मुरुमकर, रामभाऊ जगदाळे, नगरसेवक सचिन मस्के, अ‍ॅड. विक्रम हिप्परकर, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, सचिन बंडापल्ले, पुनित पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, शिर्डी देवस्थानचे लेखापाल सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्ताविक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी केले.


Comments

Top