लातूर: मागच्या काही काळापासून काही समाजकंटक मंडळी समाज माध्यमातून ‘मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे’ अशी अफवा पसरवित आहेत. अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये तसेच असा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा अफवांमुळे वाटसरु, प्रवासी, ग्रामस्थ, अन्य नागरिक यांना मारहाण करणे, त्यांचा छळ केला जातो असे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आढळल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments